काल आणि आज

गोंडस किंवा वाईट, शेवटी ते स्वप्न होतं

झालं गेल्याचा हिशोब, आता सारं व्यर्थ होतं

 

बंधन गाठी सुटून, आता मन मुक्त होतं

जुनं धूसर होऊन, पुढे सारं स्वच्छ होतं

 

पुढचा मुक्काम काय, याला महत्व नव्हतं

'वाटे'वर खरं प्रेम, यातच जगणं होतं

 

- गिरीश घाटे